पवनानगर परिसरातील कॉलेजतील बारावी निकालात मुलींनी मारली बाजी,पवना सायन्स कॉलेजची १०० टक्के निकालाची परंपरा कायम
पवनानगर :
पवनानगर येथील लायन्स शांता माणेक पवना आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजने आपली निकालाची परंपरा कायम ठेवली असून तीन्ही विभागात मुलींनी बाजी मारली आहे कॉलेज मधून १३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी १३४ उत्तीर्ण झाले आहेत कॉलेजचा सरासरी निकाल ९७.८१ टक्के निलाल लागला असून सायन्स कॉलेजचा सलग चौथ्या वर्षी १०० टक्के निकाल लागत असल्याची माहिती पवना शिक्षण संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी दिली
निकाल खालीलप्रमाणे ( कसांत टक्केवारी)
*वाणिज्य विभाग – ९८.५१ टक्के*
१) तुपे दिक्षा गोपाळ- ८४.६७ टक्के
२) मोहोळ अर्पिता हरिश्चंद्र- ७९.८३ टक्के
३) सुतार श्वेता शशिकांत- ७६.६७ टक्के
*कला विभाग -९३.३३ टक्के*
१) यादव श्रेया राजू – ८२.५० टक्के
२) तुपे सायली बाळू- ७०.६७ टक्के
३) अल्हाट समिक्षा भाऊ- ७० टक्के
सायन्स विभाग – *१०० टक्के*
१) दळवी समृद्धी बाळासाहेब- ७४.१७ टक्के
२) अहिर किशन काळूराम- ६५.१७ टक्के
३) लोहर चैतन्य विजय- ६१ टक्के
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे परिसरातुन कौतुक होत आहे.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, संस्थेचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे अध्यक्ष संतोष खांडगे , उपाध्यक्ष गणेश खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार खजिनदार राजेश म्हस्के यांनी
यशस्वी विद्यार्थी व संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे,शहाजी लाखे यांच्यासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापक सर्वांचे अभिनंदन केले.