आंबेडकर राइट्स सोशल स्टडी अँड रिसर्च अकॅडमी तसेच आर.पी.आय .(आठवले)यांच्या विद्यमाने “विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न.
लोणावळा :
लोनावल्यात हॉटेल चंद्रलोक येथे आंबेडकर राइट्स सोशल स्टडी अँड रिसर्च अकॅडमी तसेच आर.पी.आय (आठवले) यांच्या विद्यमाने “दहावी,बारावी,उत्तीर्ण,विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

या विद्यार्थी गुण गौरव समारंभात प्रमुख पाहुणे श्री. सत्यसाई कार्तिक (सहाय्यक,पोलिस अधीक्षक लोनावला विभाग)उपस्थित होते.या प्रसंगी सूर्यकांत वाघमारे (प.महाराष्ट्र अध्यक्ष, आर पी आय,सदस्य पुणे . जि.नियोजन समिति),नारायण भालेराव (मा.ता.अध्यक्ष, आर पी आय.),गणेश गायकवाड (सरचिटनीस पु.जी.रि.पा.ई.), यमुना साळवे(सदस्य प .महाराष्ट्र ) कमलशिल म्हस्के ( शहराध्यक्ष,लोनावला, आर पी आय) तुफैल शेख(अध्यक्ष, अल्पसंख्यांक,आघाड़ी),विजय देसाई (वरिष्ठ उपाध्यक्ष,R PI मावळ ),अनिल वाघमारे ( अध्यक्ष जयंती महोत्सव२०२४),अनिता वाघमारे(अध्यक्ष, र. म. वि.प्रतिष्ठान),नासिर शेख( शहराध्यक्ष राष्ट्रवादी,कांग्रेस पक्ष (,शरद पवार गट)संजय भोईर(शहराध्यक्ष,शिवसेना),अरुण लाड (शहराध्यक्ष,भाजपा),ब्रिंदा गनात्रा(मा.नगरसेविका लो. न. प.),डॉ. जिभाऊ बच्छाव(प्राचार्य, लोनावाला कॉलेज) इत्यादी मान्यवरांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सत्यसाई कार्तिक यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्याना जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या चार सूत्रांची माहिती दिली.या कार्यक्रमास शहर, तालुक्यामधून कार्यकर्ते,पदाधिकारी,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.







