विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचे ज्ञान आत्मसात करून जागतिक पातळीवरती ठसा उमटवावा – श्री कल्याण जाधव
पुणे :
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवार दिनांक 27 जून 2024 रोजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष
श्री. जालींदर कामठे यांचेकडून पुरंदर तालुक्यातील इयत्ता दहावी व व इयत्ता बारावी प्रत्येक विद्यालयातून प्रथम आलेल्या व तालुक्यात प्रथम आलेल्या एकूण 75 विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालय हिवरे येथे संपन्न झाला.
एक लाख रुपये रोख शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना ट्रिनिटी इंजिनिअरिंग कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष श्री कल्याण जाधव यांनी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारचे ज्ञान आत्मसात करून जागतिक स्तरावरती आपला ठसा उमटवावा जीवनामध्ये पुढे जात असताना सामाजिक बांधिलकी जपावी. ज्या क्षेत्रामध्ये जाऊ त्या ठिकाणी अग्रभागी राहण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
सदर प्रसंगी मार्गदर्शन करताना जालींदर कामठे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ म्हणजे कौतुकाचा भाग आहे. तुम्ही खूप छान गुण मिळवले आहेत. त्यामुळे तुमच्या पाठीवर कौतुकाची टाकलेली ही थाप आहे. ही कौतुकाची थाप घेऊन जाताना हे ही लक्षात ठेवून जा की ही गुणवत्ता आपल्याला टिकवता आली पाहिजे. आणि याच गुणवत्तेच्या आधारे आपल्या भविष्यातील स्वप्नपूर्ती साठी याची मदत होईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी व उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा खूप मोठे व्हा,शिका आई वडिलांचे संस्थेचे नाव उज्वल करा अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ दिगंबर दुर्गाडे अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे होते.
सदर प्रसंगी निलेश जगताप माजी सभापती पंचायत समिती पुरंदर, भानूकाका जगताप, संतोष जगताप, पांडुरंग देवकर, एम के गायकवाड, भारतीताई गायकवाड, सरपंच हिवरे रामदास कुदळे, उपसरपंच हिवरे, गुलाब गायकवाड, सागर कुदळे, पुरुषोत्तम तिवटे, नंदू शेठ गायकवाड, विद्यार्थी ग्रामस्थ व इतर नागरिक, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास भोसले यांनी केले तर मुख्याध्यापिका सुनिता रायडू यांनी आभार व्यक्त केले.