नूतन अभियांत्रिकीमध्ये ” नूतन इन्नोथ्रिव २ के २५ ” प्रकल्प स्पर्धा संपन्न
तळेगाव दाभाडे :
नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये ‘ नूतन इन्नोथ्रिव २ के २५ चे नूतन इन्स्टिटयूट ऑफ इनोव्हेशन कौन्सिल (आय आय सी ) च्या वतीने नुकतेच आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून दोनशे हुन अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. या प्रकल्प स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विषयान्वे चाळीसहून अधिक नाविन्यपूर्ण कल्पनांवर आधारित सादरीकरण केले .
या स्पर्धेमध्ये इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्पुटर इंजिनीरिंग- एआय , तसेच प्रथम वर्ष या विभागातील विद्यार्थ्यांनी ग्रीन आणि सस्टेनेबल इंजिनिअरिंग , स्मार्ट टेक्नोलॉजी अँड ऑटोमेशन, हेल्थकेअर आणि बायोमेडिकल इंजिनिअरिंग , रिन्यूएबल एनर्जी आणि क्लीन टेक,सिव्हिल आणि स्रकचरल इंजिनिअरिंग इनोवेशन्स, ऐरोस्पेस आणि ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजीस, सायबर सिक्युरिटी आणि डिजिटल सोल्युशन्स, अडवान्सड मॅनुफॅक्चरिंग आणि इंडस्ट्री 4.0 , बायोटेक्नोलॉजी आणि फूड इंजिनिअरिंग, डिजास्टर मॅनेजमेंट आणि सेफ्टी इंजिनिअरिंग ,एआय आणि सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्पुटर इनोवेशन्स आदी विविध विषयांवर प्रकल्प सादर केले केले आणि नवनवीन कल्पनांसह प्रतिकूल समस्यांवर उपाय सुचविले. प्रत्येक विषयामध्ये तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आधुनिकतेचा वापर करून प्रगतीचा मार्ग दाखवण्याचा प्रयन्त केला.
कार्यक्रमाचे उदघाटन नूतन अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार यांच्या हस्ते केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एस. एन. सपली, डीन आर अँड डी डॉ. विलास देवतारे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. नितीन धवस आणि एन. आय. सी चे सीईओ श्री. मुजाईद शेख उपस्थित होते.
डॉ. जहागीरदार यांनी विद्यार्थ्यांना भारताच्या प्रगतीसाठी नवनवीन शोध आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहीत केले.
‘ शिक्षण घेत असताना जिथे कुठे तंत्रज्ञान विषयात कार्य कराल तिथे नाविन्याचा ध्यास घ्या आणि आनंदाने काम करा,’ असे उदगार डॉ. एस. एन. सपली यांनी बोलताना व्यक्त केले. डॉ. देवतारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी दशेत आपली विचारसरणी सुधारण्यासाठी काही टिप्स सांगितल्या.
या स्पर्धेसाठी डीन आयआयसी डॉ. सतीश मोरे, आयआयसी संयोजक डॉ. एम. के बिरादार, आयआयसी समन्वयक प्रा. नीलिमा बावणे यांनी काम पहिले. तर विविध आस्थापनातील तज्ज्ञ परीक्षक म्ह्णून लाभले. विभागीय समन्वयक आयआयसी प्रा. काव्यश्री, प्रा. भाग्यश्री वऱ्हाडे, प्रा. विवेक नागरगोजे, प्रा.डी.आर. जाधव, डॉ. उमा पाटील, प्रा. आर. सी. गहाणे, प्रा. अनिरुद्ध दुबल, आणि प्रा. अंकुश पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.