खरेदी विक्री संघ संपूर्ण तालुक्याला बियाणे व खतांचा पुरवठा करेल आमदार सुनील शेळके यांचा विश्वास
वडगाव मावळ दि.७
मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले सहकार कृषी सेवा केंद्र भविष्यात संपूर्ण तालुक्याला खते व बियाणांचा पुरवठा करेल असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.
खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून इंद्रायणी भाताचे बियाणे व खतांचा पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सहकार कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन आमदार शेळके यांच्या हस्ते व जिल्हा बँकेचे संचालक माऊली दाभाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, जेष्ठ नेते गणेशआप्पा ढोरे, दिपक हुलावळे, जिल्हापरिषद सदस्य संतोष राऊत, अनंता पावशे, भरत मोरे, पंचायत समिती सदस्य रेश्मा देवकर, आशा मोरमारे, काळूराम मालपोटे, गणपत भानुसघरे, तानाजी पडवळ, सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट, कृषी अधिकारी मारुती साळे, खरेदी विक्री संघाचे सभापती किरण हुलावळे, उपसभापती सुनिता केदारी आदी उपस्थित होते.
आमदार शेळके म्हणाले, शेतकरी समृद्ध झाला तरच आपला मावळ आणि महाराष्ट्र समृद्ध होईल, या भावनेतून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी हा कौतुकास्पद उपक्रम सुरू करण्यात आला आहे. संघाच्या माध्यमातून शेतकरी भवन उभारण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
माऊली दाभाडे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून संघाच्या माध्यमातून शेतकरी हिताचे उपक्रम राबविले पाहिजे, संघाच्या भविष्यातील प्रकल्पांसाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन दिले.
यावेळी संचालक भरत येवले, एकनाथ येवले, माणिक गाडे, शिवाजी असवले, शहाजी कडु, प्रमोद दळवी, गणेश विनोदे, ज्ञानेश्वर निंबळे, रूपेश घोजगे, रमेश भुरूक, विष्णू घरदाळे, मधुकर जगताप, बाजीराव वाजे, शरद नखाते, आशा खांडभोर, मनिषा आंबेकर, अमोल भोईरकर, विष्णू मुऱ्हे, विठ्ठल घारे, सचिव किरण लोहर यांच्या सह संस्थेचे सभासत व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सुनिता केदारी यांनी स्वागत तर किरण हुलावळे यांनी प्रास्ताविक व राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमोल केदारी यांनी सूत्रसंचालन केले, माणिक गाडे यांनी आभार मानले.
३५ वर्षांनी खरेदी विक्री संघ पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत !
दरम्यान, खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून बियाणे, खते, साखर पुरवठा होत होता, परंतु सन १९९१ पासून सर्व व्यवहार बंद होते. मागील पंचवार्षिक काळातील संचालक मंडळाने गाळे बांधून संघाला उत्पन्न सुरू केले होते तर आताच्या संचालक मंडळाने ३५ वर्षानंतर पुन्हा बियाणे व खतांचा पुरवठा सुरू करून संघ शेतकऱ्यांच्या सेवेत आणला आहे.






