इंद्रायणी कॉलेजचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर येलघोल मध्ये संपन्न
इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर येलघोल या गावात सोमवार दिनांक 18.12. 2023 ते रविवार दि.24.12.2023 यादरम्यान संपन्न होत आहे.इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय.श्री. चंद्रकांतजी शेटे साहेब यांच्या शुभहस्ते श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन झाले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ. संभाजी मलघे सर, मा.सरपंच श्री. जयवंत घारे, सरपंच सौ. प्रियंकाताई घारे, सदस्य श्री.गोरक्षनाथ घारे,पोलीस पाटील सौ. अंजनाताई कदम,उपसरपंच सीताबाई भिलारे माजी सरपंच श्री. शांताराम भरणे, मुख्याध्यापक श्री. तांदळे सर आदी मान्यवर या निमित्ताने उपस्थित होते. मा.चंद्रकांत जी शेटे साहेब यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना म्हटले की येलघोल या गावची ग्रुप ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते.प्रत्येक व्यक्तीमध्ये सहकार्याची भावना मोठी आहे. विद्यार्थ्यांनी या गावांमध्ये चांगले काम करावे व आपल्या इंद्रायणी महाविद्यालयाची उंची वाढवावी. असे मनोगत व्यक्त केले.
ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना म्हटले आहे की इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष माननीय रामदासजी आप्पा काकडे यांच्या कुशल नेतृत्वामुळे त्यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक नवनवीन पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम आपल्या मुलांसाठी उपलब्ध केले आहेत.येलघोल मधील मुले सुद्धा महाविद्यालयात शिकतात. ही आमच्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलघे सर यांनी आपल्या महाविद्यालयातून वरिष्ठ विभागातून आतापर्यंत 45 निवासी कॅम्प व कनिष्ठ विभागातून 22 कॅम्प प्रत्येक गावात यशस्वी झाले.महात्मा गांधीजींची ग्राम स्वच्छतेची चळवळ पुढे नेऊया. खेडी सुधारली तर देश सुधारेल असे प्रतिपादन त्यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. कार्यक्रमाधिकारी प्रा.आर.आर. डोके यांनी केले. प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. एस.आर. जगताप सर यांनी केले व आभार प्रा. एस. बी. शिंदे मॅडम यांनी मानले.
सर्व शिबिरार्थींनी पहाटे 6.00 ते 7.00 या वेळेत योग प्राणायाम केले सर्व प्रात्यक्षिके. जगताप सर यांनी विद्यार्थ्यांना करून दाखविले. व सर्वांकडून करून घेतले. सर्व शिबिरार्थींनी शाळा,मंदिर, गावस्वच्छता इत्यादी सर्व ठिकाणची साफसफाई केली. शिबिरामध्ये एकूण मुली 37 व मुले 17 अशी 54 संख्या आहे. विद्यार्थ्यांचे एकूण सहा गट तयार करून संपूर्ण सात दिवसांचे कामाचे नियोजन कसे असणार आहे.याची सर्व माहिती प्राध्यापक आर आर डोके यांनी विद्यार्थ्यांना दिली आपत्ती व्यवस्थापन व वन्यजीव संवर्धन या विषयावर सर्पमित्र श्री.निलेशजी गराडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या समवेत आलेले श्री.जिगर सोळंकी सर यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव रेस्क्यू व मानव रेस्क्यू याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली.
या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहून उपप्राचार्य प्रा. एस.पी.भोसले सर यांनी विद्यार्थ्यांना सुंदर मार्गदर्शन केले तसेच श्री. गोरख भाऊ काकडे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उपस्थितानमध्ये विज्ञान वरिष्ठ विभाग प्रमुख प्राध्यापक. रोहित नागलगाव सर,विज्ञान कनिष्ठ विभाग प्रा.खाडप सर कला विभाग प्रमुख के . डी.जाधव सर व प्राध्यापक ए. एम.जगताप सर श्री अशपाक सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. संध्याकाळी सर्व विद्यार्थ्यांनी “मोबाईलचा वापर किती योग्य किती अयोग्य”या विषयावर विद्यार्थ्यांनी चर्चेत उत्स्फूर्त असा सहभाग घेतला होता. सर्व विद्यार्थ्यांना नवीन शिकायला मिळत असल्याने त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.